गुरुवार, ३० जून, २०२२

"हूरहूर पाठराखण...!"

























प्रा.छबुराव भांडवलकर

यांच्या हूरहूर यांच्या पुस्तकाची पाठराखण.

----------------------------------------------------------------------------
साहित्यस्नेही छबुराव भांडवलकर यांचा "हूरहूर" हा कथासंग्रह एकूणच ग्रामीण माणसांचा कैवार घेणारा आहे. ग्रामीणांच्या व्यथा- वेदनांची परिक्रमा प्रस्तुत संग्रहात प्रतिबिंबित झाली आहे. दीनदुबळ्या माणसांचा प्रपंच चालवण्यासाठी चाललेला संघर्ष, त्यात होणारी त्याची प्रापंचिक वाताहत, त्यांच्या एकूणच संघर्षाचे पैलू या कथासंग्रहात समर्थपणे चित्रित केले आहेत. कथाकार भांडवलकर यांची ग्रामीण जीवनाशी असलेली आस्था आणि ग्रामीणांचे वास्तवदर्शी ऋणानुबंध त्यांना लेखन करण्यास भाग पाडतात.किंबहुना ते त्यांच्या कथालेखनाचे बलस्थान आहे. 
      कथा आणि कादंबरी लेखनाचे मर्म भांडवलकरांना सापडले असल्यामुळे त्यांच्या कथेतील सर्व पात्रे अगदी जीवंत वाटतात. त्यांच्या कथालेखनात काल्पनिकता नसून वास्तववाद ठासून भरलेला आहे. समाजाशी असलेली त्यांची जवळीकता आणि सहानुभूती ही त्यांच्या लेखनानुभूतीला खतपाणी घालते.
      ग्रामीण जीवन जाणिवेतून येणार्या त्यांच्या कथा माणूसकेंद्री आहेत.त्यांच्या कथेतून त्यांनी जणू त्या - त्या पात्रांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हा लेखनप्रपंच सुरू ठेवला आहे असे वाटते. 
           मानवतादर्शी वास्तववाद हा त्यांच्या कथासूत्राचा गाभा आहे. अर्थात ही सहानुभूतीची अंतस्थ भावुकता कथेच्या रुपाने ती कागदावर सहजपणे आणि  निर्लेप उतरत जाते हे विशेष..! 
           त्यांच्या कथानकात येणारी समयोचित प्रतिके, प्रतिमा आणि म्हणी ह्या दैनंदिन जीवनातील घटकांच्या घडामोडींशी,आणि घटनांशी एकरूप होत जातात आणि कथानकाला सौंदर्य प्राप्त होते. हेच त्यांच्या कथालेखनाचे यश आहे.
     मित्रवर्य, कथाकार- छबुराव भांडवलकर यांच्या आगामी  कथालेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा...!

डाॅ.धोंडोपंत मानवतकर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...