रविवार, २७ ऑगस्ट, २०२३

मणिपूर...स्त्रीयांची विटंबना आणि सरकारची नैतिक जबाबदारी.

|| मंथनाचे पैलू ||   लेखांक -२६

मणिपूर...स्रियांची विटंबना आणि सरकारची नैतिक जबाबदारी

प्रासंगिक लेखन - डॉ.धोंडोपंत मानवतकर






















       संभाजीनगर येथे दि.२६ जुलै रोजी विविध समुहातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता ते बॅनर होते, मणिपूर घटनेचा तीव्र निषेध " शांतता रॅली "
         मणिपूर येथे ४ मे रोजी घडलेली घटना जुलैमध्ये जनतेला कळते म्हणजे तब्बल तीन महिन्यांनी ती उघडी पडते.  कमालीची संवेदनशील असलेली पोलीस यंत्रणा आणि त्याहूनही संवेदनशील असलेली पत्रकारिता....यांच्या नजरेतून ही घटना का व कशी निसटते ? हे प्रकरण
 निसटण्याच्या पाठीमागे कोणती कारणे आहेत, कोणती शक्ती आहे..ह्या शक्तीने स्त्रियांच्या वस्त्रहरणाचा, बलात्काराचा आणि खूणाचा इतका क्रूर आणि विकृत प्रकार का उघडा पडू दिला नाही ? यामागे कोणतं विशेष कारण आहे ? हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न का केला गेला ? तो कोणी केला ?  याकडे मणिपूरच्या प्रशासनाने किंवा केंद्र सरकारने लक्ष न देण्याची कारणे काय आहेत ? याबाबत अनेक प्रश्न जनतेला पडलेले आहेत. ती कारणे हळहळू समोर येऊ लागली आहेत. अनेक स्त्रिया रस्त्यावर उतरल्या आहेत. अनेक स्त्रिया परखडपणे बोलत आहेत. सरळसरळ  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेच का तुमचे अच्छे दिन वर बोलत आहेत. एकेरी बोलत आहेत. कारण स्त्रियांचा अब्रू चे धिंडवडे काढणाऱ्या घटनेने भारत देश पेटून उठला आहे.
        स्त्रियांना नग्न करून धिंड काढणाऱ्या देशात स्त्री ही सुरक्षित नसल्याची जाणीव आता समस्त स्त्री वर्गाला झाली आहे. तिची अब्रु चव्हाट्यावर आणून देश कोणत्या विकासाच्या गप्पा मारत आहे, कोणत्या संस्कृतीचे मॉडेल समाजासमोर ठेवत आहे. कोणत्या संस्कृतीचे मॉडेल जगासमोर ठेवत आहे, अशी क्रूरकृत्ये करणारा देश विश्वगुरू कसा बनेल..?  असे अनेक प्रश्न स्त्रीयांना पडत आहेत. 
         औरंगाबाद येथील मोर्चातील स्रियां सवाल करत आहेत की, आम्ही शाळेच्या प्रार्थनेत रोज म्हणतो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. ह्या प्रार्थनेतील बांधव कुठे आहेत? आपल्या भगिनींना नग्न करून त्यांची धिंड काढली जाते, हा प्रकार देशाची प्रतिमा मलीन करणारा आहे....प्रत्येक स्त्री ही कुणाची तरी आई असते, कुणाची बहीण असते, कुणाची भावजय, कुणाची चुलती, काकू असते ह्यावेळी ह्या लोकांना स्त्रीची अब्रू चव्हाट्यावर आणतांना लाज वाटली नाही का ? ही केवळ  मणिपूर राज्यातील स्रीची अब्रू चव्हाट्यावर आलेली नाही तर भारत देशाची अब्रू चव्हाट्यावर आलेली आहे.
           मणिपूर राज्य हे भारताचा भाग आहे. म्हणून भारतातील केंद्र सरकारने या राज्यातील जनतेत होणारा सततचा संघर्ष कसा टाळता येईल. मणिपूरच्या प्रशासनाने स्त्रीची अब्रू घेणारे प्रकार, बलात्काराचे प्रकार, खूणाचे प्रकार  असे विकृत प्रकार थांबविण्यासाठी कठोर पावले उचलावीत.
आणि देशाची अब्रू वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत. हा अत्यंत विकृत प्रकार लोकशाही देशाच्या संस्कृतीला काळीमा फासणारा आहे. 
         भारत हा अनेक जातीधर्माचा देश आहे. अनेक जातीधर्माच्या लोकांना संविधानाने त्यांचे हक्क दिलेले आहेत. प्रत्येक धर्माचे स्वातंत्र्य अबाधित राहिले पाहिजे असा
कायदा असताना विद्यमान केंद्रसरकारने स्वतःचा धर्मच श्रेष्ठ  आहे आणि तो इतरांनी स्वीकारावा अशा प्रकारच्या हिंदुराष्ट्राची कल्पना जनतेवर लादण्याचे प्रयत्न करत आहेत.
        परंतु उद्याच्या हिंदूराष्ट्रात अशाच घटना घडणार असतील तर या देशातील स्त्रिया व पुरूष हिंदूराष्ट्र ही संकल्पना स्वीकारतील का ?   
        विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे भारताला आधुनिक भारत किंवा नवाभारत करण्याचे स्वप्न पहात असताना एकिकडे  अशांतता आहे. भांडण तंटे, जाळपोळ, मोर्चे, दंगली...हिंदू-मुस्लिम एकमेकांच्या विरोधात उतरविण्याच्या प्रकारांना थाबवणे नव्या भारतासाठी गरजेचे आहे.
         या देशात तर सर्व धर्म समभावाची शिकवण दिली जाते. एकतेची, समतेची, बंधुत्वाची शिकवण दिली जाते. इथली न्यायव्यवस्था समन्यायी धोरणाचा स्वीकार करते. ज्यांची या देशावर आज सत्ता आहे तेच सांगतात,"आम्ही बुध्दाच्या देशातून आलोय..! असा बाहेरच्या देशात बुध्दाचा दिंडोरा पिटवला जातोय..बुद्ध म्हणजे  प्रज्ञा,शील, करूणा,शांती, संयम, माणुसकी, जिव्हाळा, समता, बंधुता, एकता, स्वातंत्र्य, न्याय, मानवी हक्क होय.!.....आणि हे तर कधीच नष्ट झाले आहे. ते  राजकारण्यांनी नष्ट केले आहे. सत्तेसाठी केले आहे. सध्या बुद्धाच्या देशात अशांती निर्माण झालेली आहे. अशा अशांती निर्माण करणाऱ्या लोकांच्या मुस्क्या का आवळल्या जात नाहीत ?  या देशात दंगली का घडवल्या जातात? ह्या देशात स्त्रिया का असुरक्षित आहेत..?  स्त्रीयांची नग्न धिंड कोणत्या शासनाच्या काळात काढली जात आहे ? ती मुगलाच्या शासनकाळात काढली गेली नाही, ती इंग्रजी शासनाच्या काळात काढली गेली नाही किंवा गेल्या पंचाहत्तर वर्षात काढली गेली नाही हा प्रकार कोणाच्या सत्ता काळात होतोय ? 
       हे का घडतंय ? अशा विकृत प्रवृत्तीसाठी फाशी, जन्मठेप, काळेपाणी, अशी शिक्षा असेल तरच लोकांना या सरकारची भीती असेल..! नसता.. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर सरकारचा अंकुशच नसल्याचा मॅसेज समाजात फिरेल. मणिपूरात सामाजिक संघर्षातून होणाऱ्या अशा कृतीला वेळीच आळा घालवून थांबवले तरच देशात शांतता नांदेल...!          
      संभाजी ब्रिगेड मुंबईचे प्रदेश प्रवक्ते व कवी श्री प्रमोद शिंदे यांनी मणिपूरच्या स्त्रियांच्या घेतलेल्या अब्रूबाबत आपल्या एका कवितेतून सोशल मिडीयावर आक्रोश व्यक्त केला आहे. त्यांच्या कवितेचं शीर्षक आहे "ती बाई होती म्हणून..." या शीर्षकाच्या कवितेतून कवी प्रमोद शिंदे यांनी हा आक्रोश मणिपूर येथे स्त्रीच्या अब्रुचे धिंडवडे काढणाऱ्या जमावाला उद्देशून केला आहे.

"ती बाई होती म्हणून...."

ती बाई होती म्हणून देश पेटला नाही,
जर का गाय असती तर, देश पेटला असता !
गल्लीतला सो कोल्ड हिंदू नेता चेतला असता!
भगवे झेंडे घेवून रस्त्यावर उतरला असता ! 
धर्म रक्षणासाठी दोन चार पुतळे जाळले असते,
काहींच्या फोटोला चपलाचे हार घातले असते, 
जय हिंदुराष्ट्र म्हणत किंचाळला असता, ओरडला असता!
पण; आता ते होणार नाही
कारण ती बाई होती,
गाय असती तर देश पेटला असता!

इथे बाईला बाप्याच्या गर्दीत नागवं फिरवणं 
शूरपणाचं मेडल ठरतं!
इथे पोरीला मंदिरातच पुजाऱ्याने बलात्कार 
करणं पुण्य समजलं जातं!
इथे बलात्काऱ्यांना तुरुंगातून सन्मानाने 
बाहेर काढून औक्षण केलं जातं!
बलात्कार हे वीर योध्यासाठी राजकीय 
हत्यार मानलं जातं!
त्या देशात आणखीन काय होणार!
कारण ती फक्त बाई होती, 
गाय असती तर देश पेटला असता!

कुठे गाय कापली म्हणून रान उठवणारे गांडू!
कुठे गायीचं मांस भेटलं म्हणून हत्याकांड घडवणारे भडवे!
ब्रिजभूषणला पाठीशी घालणारे लंडचडे!
बाईला विधवा म्हणून हिणवणारे चौकीदार!
गांडीखालची लाल दिव्याची गाडी अन तुरुंगाची बेडी वाचविण्यासाठी कमरेचं सोडून देणारे नेते !
त्या देशात आणखीन काय होणार,
ती फक्त बाई होती, 
गाय असती तर देश नक्कीच पेटला असता!.....
सैतानाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी 
रात्रीचं कोर्ट चालवणारी 
सन्यासाला ट्रायलच्या नावाखाली तुरुंगात
खितपत ठेवणारी,चांडाळ न्यायव्यवस्था,
पत्रकारितेचा धंदा करून स्वतःचं शील विकणारी पत्रकारिता!
लोकशाहीला बाजारात बसवून पोटाची खळगी भरणारी निवडणूक व्यवस्था,
त्या देशात आणखीन काय होणार,
ती फक्त बाई होती,
गाय असती ना तर देश पेटला असता,
देश पेटला असता !.........
✍️
प्रमोद शिंदे भ्रमणध्वनी ९९६७०१३३३६

           अनेक स्त्रियानी व पुरूषांनी मोर्चे काढून मणिपूरच्या घटनेवर आक्रोश व्यक्त केलेला आहे, करत आहेत. केंद्र सरकार या मणिपूर घटनेबाबत काय ठोस निर्णय घेणार आहे याकडे जनतेचे लक्ष लागून आहे.

डॉ.धोंडोपंत मानवतकर

२८ जुलै २०२३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...