शुक्रवार, १८ मार्च, २०२२

अण्णाभाऊंचा लढा हा शोषित माणसांच्या हितासाठी होता."...

"अण्णाभाऊंचा लढा
हा शोषित माणसांच्या हितासाठी होता "

डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांचे प्रतिपादन... 

--------------------------------------------------------------------
   
                  साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांचा लढा हा कष्टकरी,शेतकरी, शेतमजुर,दलित, पीडित, दुबळ्या अशा शोषित माणसांच्या हितासाठी होता ; छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले,राजर्षि शाहू महाराज,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचं महान कार्य साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी केलेलं आहे. असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक,कवी डाॅ. धोंडोपंत मानवतकर यांनी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या राष्ट्रीय फेसबुक लाईव्ह व्याख्यानमालेत दहावे पुष्प गुफतांना केले.
     म.स.शि.प्र.मंडळाचे स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालयाचे वतिने आयोजित कार्यक्रमात ते " साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या शाहिरीतून आलेल्या वर्गीय जाणिवा : एक विश्लेषण या विषयावर ते बोलत होते. या राष्ट्रीय व्याख्यानमालेत पुढे  बोलताना डाॅ.धोंडोपंत मानवतकर म्हणाले की, अण्णाभाऊ साठे हे केवळ वेदना मांडणारे साहित्यिक किंवा नायक नव्हते; तर दुःख वेदनांवर उपाय सांगणारे साहित्यिक होते...त्यांच्या शाहिरीतून आलेल्या वर्गीय  जाणीवांचा परामर्श घेत सामाजिक वर्गीकरणातून येणार्या टोकाच्या विदारक विषमतेचे विश्लेषण करून अण्णाभाऊंनी आपल्या लेखनातून आणि सामाजिक लढ्याद्वारे शोषणव्यवस्थेवर कडाडून हल्ला केल्याचा प्रत्यय अण्णाभाऊंच्या समग्र साहित्यातून येतो असेही डाॅ.धोंडोपंत मानवतकर यांनी स्पष्ट केले. 
       स्वामी विवेकानंद वरिष्ठ महाविद्यालय मंठाच्या राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आयोजित केलेल्या साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या राष्ट्रीय व्याख्यानमालेत महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि महाराष्ट्रातील अनेक दिग्गज, प्रज्ञावंत मान्यवर मंडळी या लाईव्ह कार्यक्रमात सहभागी झालेली होती.
      या दहाव्या पुष्प व्याख्यानमालेच्या प्रमुख व्याख्यात्यांचे आभार प्रा.के.एम.कांबळे यांनी मानून मागील नऊ व्याख्यानाच्या कार्यक्रमावर प्रकाश टाकला.
            सदरहु कार्यक्रमाचे मुख्यआयोजक प्राचार्य डॉ. भारत खंदारे तसेच उपप्राचार्य प्रा.डाॅ. सदाशिव कमळकर,उपप्राचार्य प्रा.डाॅ.बापुराव  सरोदे, रा.से.यो.चे जिल्हा समन्वय प्रा. डाॅ. सुभाष वाघमारे यांचे सहकार्य मोलाचे होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डाॅ.जितेंद्र जगताप, प्रा.डाॅ. भरत धोत्रे व प्रा. रविंद्र गायके यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...