मंगळवार, २९ मार्च, २०२२

आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने कु.गीता बालासाहेब घनवट व कवी प्रदीप ईक्कर यांचा यथोचित सत्कार..!

"आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने 

कु.गीता घनवट व कवी प्रदीप ईक्कर यांचा यथोचित सत्कार...!


        मंठ्याची सुपुत्री कु.गीता बालासाहेब घनवट हीची सीमा सुरक्षा दलात निवड झाली असून तिने पंजाब येथे सुरक्षा दलाचे प्रशिक्षणही पूर्ण केले. कु.गीता घनवट  हीच्या सीमा सुरक्षा दलात जाण्याच्या धाडसाबद्दल व यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल मंठेकरांनी तिची शहरात भव्य मिरवणुक काढली अनेक ठिकाणीं तिचे सत्कार झाले. 
          दि.२८ मार्च रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीनेही गीता घनवट हीचा मंडळाच्या सदस्या पत्रकार मंजुषा काळे यांनी शॉल पुष्पहार घालून सत्कार केला. व गीताची आई .........घनवट यांचाही  यावेळी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.
         याच कार्यक्रमात आविष्कार साहित्य मंडळाचे सदस्य तळणी येथील ग्रामीण कवी प्रदीप ईक्कर यांच्या हिरवा पांडुरंग या पहिल्या कविता संग्रहाला महाराष्ट् साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळाल्याबद्दल आविष्कार साहित्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. धोंडोपंत मानवतकर यांनी कवी ईक्कर यांचा शॉल पुष्पहार घालून सत्कार केला. 
यावेळीं गीता घनवट हीची प्रकट मुलाखतही मंजुषा काळे यांनी घेतली. 
याच कार्यक्रमात प्रा.सदाशिव कमळकर यांनी  नवोदित ग्रामीण कवी प्रदीप ईक्कर यांच्या कडून  हिरवा पांडुरंग या आगामी संग्रहातील काही ग्रामीण कविता वदवून घेतल्या.
      यावेळीं आविष्कार साहित्य मंडळाचे सचिव प्राचार्य कुं.पी.इंगळे, सदस्य बाबुजी तिवारी, प्रा.प्रदीप देशमुख, शिवाजी जाधव, उपाध्यक्ष-डॉ.संतोष मोरे,कोषाध्यक्ष - ओमप्रकाश राठोड,विजय गायकवाड यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...