मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहू नका- डॉ.धोंडोपंत मानवतकर

महापुरुषांना जातीच्या चष्म्यातून पाहू नका.
- डॉ.धोंडोपंत मानवतकर





सर्वच महापुरुषांचे कार्य हे देशातील जनतेच्या हितासाठी होते म्हणून त्यांना कुठल्याही एका जातीत बंदिस्त करु नका, किंवा त्यांना जातीच्या चष्म्यातून पाहू नका, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी केले. यावेळी पुढे बोलतांना डॉ.धोंडोपंत मानवतकर म्हणाले की, साहित्यरत्न अण्णा भाऊसाठे यांची जयंती आता नाचून नव्हे, तर वाचून साजरी करण्याची गरज आहे. 
         केदार वाकडी (ता.मंठा ) येथे दि.२९ ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची १०२ वी जयंती साजरी करण्यात आली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिवीर लहुजी साळवे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पाहुण्यांच्या स्वागतानंतर भाषणाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
        यावेळी सामाजिक कार्यकर्ते रंगनाथ बापु वटाणे म्हणाले की, "मातंग समाजाने  सर्वांगिण परिवर्तनासाठी धर्मांतराच्या दिशेने पावलं टाकण्याची गरज आहे. "जग बदल घालुनि घाव, सांगून गेले मला भीमराव" अण्णाभाऊचे हे गीत परिवर्तनाच्या चळवळीचा विचार मांडणारे आहे. याचा विचार मातंग समाजाने केला पाहिजे.
      दुपारी ४ वाजता साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर उपस्थितांनी आपले विचार मांडले. या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केदार वाकडी येथील माजी सरपंच केदारी पवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर व रंगनाथ बापू वटाणे हे उपस्थित होते. गावातील प्रतिष्ठित नागरिक महेश कव्हळे, कृष्णा कव्हळे,विष्णू कव्हळे,अंगद कव्हळे यांच्यासह राजेश तांबे, पिराजी हजारे,जयभीम सेनेचे उद्घवभाई सरोदे, पिराजी पवळे, प्रभाकर कांबळे आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश आठवे यांनी केले, तर गजानन पवार यांनी आभार मानले.
     सायंकाळी ६ वाजता अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जवळपासच्या खेड्यातील अनेक तरुण सहभागी झाले होते.
     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष पवार,अशोक हातागळे,किशोर पवार, राजेश वाघमारे, ओम पवार, शिवाजी थोरात, गजानन पवार, अनिल कांबळे, अशोक पवार, राजेश लोंढे, विक्रम पवार, दत्ता पवार, अजय पवार, संदीप पवार आदीं तरुणांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

चांगले संस्कारच माणसाचं आयुष्य सुंदर करतात - डॉ.धोंडोपंत मानवतकर

चांगले संस्कारच आयुष्य सुंदर करतात... - डॉ.धोंडोपंत मानवतकर          मंठा /प्रतिनिधी         "आयुष्यात चांगला माणूस होण्यास...